
कोपरगाव प्रतिनिधी.
आ. आशुतोष काळे यांचा मतदार संघात सुरु असलेला विकासाचा झंझावत व त्यांची काम करण्याची कार्यपद्धती पाहून अनेक पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु असून चासनळी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी (दि.१५) रोजी दसऱ्याचा मुहूर्त साधत माजी आ.अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून या कार्यकर्त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे.
कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच घटकांचा सहभाग असणे गरजेचे असून त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास सहज साध्य करता येणार आहे. आ.आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात मतदार संघातील विकासाचे बहुतांशी प्रश्न मार्गी लावले आहे. त्यामुळे सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नसतांना देखील मागील काही महिन्यांपासून विरोधी पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दाखल होत आहे. अशाच प्रकारे दसऱ्याच्या मुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते भगीरथ गाडे, गणपतराव गाडे, संजय गाडे, धनंजय गाडे, मदन गाडे, बाळासाहेब गाडे, प्रसाद गाडे, मुकुंद गाडे, अक्षय गाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, सोमनाथ चांदगुडे, दिलीपराव चांदगुडे, संदीप जाधव, सुनील गाडे, गणेश आहेर आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या भगीरथ गाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. ते म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांना राजकीय वारसा असला तरी कोरोना महामारीत न डगमगता योग्य त्या उपाययोजना करून मतदार संघाच्या विकासाचा आलेख चढता ठेवला आहे. कार्यकर्त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जीव लावणे, कधीही कुणाची फसवेगिरी न करता राजकारणात दिलेला शब्द पाळणे ही काळे परिवाराची जिल्ह्यात नव्हे तर राज्यात वेगळी ओळख आहे. कार्यकर्त्यांना योग्य सन्मान देणे हा आ. आशुतोष काळे यांचा स्थायी स्वभाव आहे. विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा कायापालट करायचा एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरु आहे. सामाजिक जीवनात काम करीत असतांना निस्वार्थी जनसेवेचा वसा घेतलेल्या आ. आशुतोष काळे यांच्यासारख्या नेतृत्वाच्या अधिपत्याखाली काम करण्यासाठी अंतर्मनाने प्रवृत्त केले. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चासनळी येथील भाजपचे निष्ठावान कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


