Monday, March 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedशंभर नंबरी आजी हौसाबाई बाबुराव पोळ!!

शंभर नंबरी आजी हौसाबाई बाबुराव पोळ!!

कोपरगाव प्रतिनिधी

माझी आजी हौशाबाई बाबुराव पोळ यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी नुकतेच निधन झाले १०० वर्ष झाली तरी अगदी ठणठणीत असलेली आजी म्हणजे शंभर नंबरी सोनेच म्हणावे लागेल
त्या काळच्या मोगलाई अर्थात मुगल हद्दीत वैजापूर येथे आजीचा जन्म झाला दोन बहिणी व दोन भाऊ यांचे पितृ छत्र बालवयात हरवले त्यांच्या आईने काबाडकष्ट करून लहानाचे मोठे केले मोठे तरी कसे म्हणावे कारण दहा बारा वर्षाची म्हणजे अगदी बालवयातच तिचे लग्न झाले
माहेरची परिस्थिती बेताची असली तरी त्या काळात मराठवाड्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना झाली त्या वेळी तिचा लहान भाऊ सीताराम आनंदा त्रिभुवन उच्च शिक्षण घेऊन पुढे चालून आयकर अधिकारी झाले
तर आजीचे चुलत भाऊ सहकार उपआयुक्त मनोहर त्रिभुवन,अँड बी एल त्रिभुवन आर के त्रिभुवन,सि के त्रिभुवन आदी माहेरकडील जवळचे नातेवाईक अत्यंत गरिबीतून शिक्षण घेऊन पुढे मोठे अधिकारी झाले
गरिबीत जन्म घेतलेल्या आजीचा येवला तालुक्यात बळेगाब नागडे येथील बाबुराव पोळ यांचे सोबत विवाह झाला लग्नानंतर माहेर कडील गरीबी कडून सुरू झालेला प्रवास सासर कडील गरिबीने सुरू झाला
दिवस भर काबाड कष्ट करून मारझोड सहन करत प्रपंच सुरू झाला त्यातच अशिक्षित पणा व त्या वेळची सामाजिक परिस्थिती यातून मुलगी शांताबाई झाली त्यानंतर सातत्याने दोन चार मुले कधी आजार पणात तर कधी भुकेने दगावली त्यातच आमचे वडील दादाहरी पोळ आजून एक मुलगी वत्सलाबाई भारस्कर अशी तीन अपत्य झाली .
पोटापाण्यासाठी नागडे गाव सोडून येसगाव ता कोपरगाव येथे वास्तव्य केले तेथील सुरळकर यांच्या कडे आजोबा सालगडी म्हणून काम करू लागले तर आजी त्यांच्या कडे मजुरी चे काम करत असतानाच त्या काळात शंकर बाग येथील भास्करराव बोरावके यांचे फळबाग सोसायटी येथे काम करावे लागले दिवसभर त्या ठिकाणी रोजाने काम करायचे आणि संध्याकाळी गवत कापून तो गवताचा भारा डोक्यावर घेऊन दहा ते बारा किलो मीटर पायी चालत जाऊन येवला येथे विक्री करायचा येणाऱ्या पैशातून मीठ पीठ मिरची आणून खायची आजी कधी निवांत असली तर जुन्या आठवणी सांगायची अशीच एक जुनी आठवण म्हणजे 1935 च्या येवला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेची आठवण नक्की सांगायची माहेर कडील भावंडे शिक्षण घेत आहेत हा प्रभाव नक्कीच तिच्यावर पडला त्यातूनच एकुलता एक मुलगा दादाहरी यास शाळेत टाकले मात्र एकुलता एक मुलगा पुढील शिक्षणा साठी जास्त दूर पाठवला नाही त्यामुळे मुलगा दादाहरी जेमतेम सातवी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे एस टी महामंडळात वाहक म्हणून नोकरीस लागला
मजुरी च्या कामाबरोबरच शेळी पालन,कोंबडी पालन, म्हैस पालन करून कुटुंबाला हातभार लावला घायपात व त्यापासून दोरखंड बनवले
पुढे चालून मुलगा नोकरी करू लागला त्या तून जमीन विकत घेतली
दुदैवाने सून मयत झाल्या नंतर नातू अरुण पोळ,दीपक आणि नितीन याना देखील शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले त्यातून अरुण रयत शिक्षण संस्थेत तर दीपक आणि नितीन हे वकील झाले तर पणतू बी टेक ऍग्री व पणती डॉक्टर झाली .दिर्घद्योगी आजींना अनेक औषधी बी बियाणे तयार करणे व त्यांची जोपासना करण्यास आवडायचे तसेच पक्षांना पाणी पिण्यासाठी झाडांना छोटे भांडे बांधून त्यात पाणी भरून ठेवणे अनेक झाडांची जोपासना करणे आधी कामे करत विशेष म्हणजे वयाची शंभरी पूर्ण केली तरी कोणताही आजार नाही कोणतीही गोळी औषध नाही त्या प्रमाणे याही वयात सर्व अवयव सुस्थित होते
अशिक्षित असली तरी कोणत्याही अज्ञान अंधश्रद्धा यांना थारा देत नव्हती तसेच सामाजिक राजकीय आदी गोष्टींचे ज्ञान होते परखड बोलणे व अफाट स्मरण शक्ती ही वैशिष्टये होती तर एकदा पाहिलेल्या व्यक्तीला कायम स्मरणात ठेवत असे
शंभर नंबरी सोने ज्या प्रमाणे ताऊन सलाखून निघते त्या प्रमाणे आमच्या आजीची शंभर नंबरी कारकीर्द ताऊन निघाली आहे
नुकताच तिने अखेरचा स्वास घेतला असून आमच्या अनेक पिढ्याना प्रेरणादायी मंत्र देऊन गेली हे निश्चित
हौसा बाई पोळ अर्थात आमच्या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली
अँड.नितीन पोळ.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!