Saturday, August 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedकर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा जलव्यवस्थापनाचावारसा आमदार आशुतोष काळे पुढे नेत आहेत!!- अॅड....

कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा जलव्यवस्थापनाचावारसा आमदार आशुतोष काळे पुढे नेत आहेत!!- अॅड. नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनिधी

शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचले पाहिजे, त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या मा.खा. स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. तालुक्यातील शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारून पाणी अडविण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली.आज त्याच विचारांचा आणि शेतकरी हिताचा वारसा आमदार आशुतोष काळे सक्षमपणे पुढे नेत असून नाटेगाव येथील गारदा नदीवरील पाण्याने भरलेला बंधारा आणि त्यामुळे शिवाराच्या तुडुंब झालेल्या विहिरी कर्मवीर शंकररावजी काळे यांचा जलव्यवस्थापनाचा वारसा पुढे नेत असल्याचे अॅड.नितीन पोळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात अॅड.नितीन पोळ यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव परिसरातून वाहणाऱ्या गारदा नदीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साखळी उभारण्यात आली आहे. मात्र, पूर्वी उपलब्ध झालेल्या अपुऱ्या निधीमुळे नदीपात्राची अपेक्षित खोली व रुंदी करता आली नव्हती. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण होत नव्हता आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नव्हता.ही अडचण लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी जलसंधारण योजनेतून मागील तीन-चार महिन्यांपूर्वी निधी उपलब्ध करून दिला. त्या निधीतून गारदा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी नदीपात्रातील गाळमिश्रित माती गरजू शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः सातत्याने पाठपुरावा केला. या कामासाठी आमदार आशुतोषकाळे यांनी वेळोवेळी सकारात्मक सहकार्य केले असल्याचे अॅड. पोळ यांनी सांगितले.आज या कामाचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात दिसून येत आहेत. गारदा नदी खोल आणि रुंद झाल्याने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे.नदीपात्रातील पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली असून अनेक विहिरी तुडुंब भरल्या आहेत.पावसाने काही काळ ओढ दिली असली, तरी नदी व बंधाऱ्यांमध्ये साठलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे उभ्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. पाण्याची उपलब्धता म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाला मिळालेली ताकद आणि त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याची हमी, ही भूमिका आमदार आशुतोष काळे यांच्या कामातून अधोरेखित होत आहे.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांसाठी पाण्याची जी चळवळ उभी केली, ती केवळ इतिहासात जपण्याऐवजी प्रत्यक्ष विकासकामांच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम आमदार आशुतोष काळे करीत आहेत. त्यामुळे “काळे साहेबांचा विचार, शेतकऱ्यांच्या पाण्याचा आधार आणि विकासाची कृती” अशी आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाची नवी ओळख निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने न देता त्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची भूमिका आमदार आशुतोष काळे यांनी घेतली आहे. गारदा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण हे त्याचे उत्तम उदाहरण असून, या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हिरव्यागार स्वप्नांना नवे बळ मिळाले असल्याचे अॅड. नितीन पोळ यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!