
कोपरगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली – सदिच्छा मंडळ कोपरगाव च्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सोहळा सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे प्रमुख अतिथी म्हणून राजेश आबा परजणे,रेणुकाताई कोल्हे, शबानाताई शेख, बबनदादा गाडेकर, बाबा खरात, साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, बाळासाहेब तापकीर, योगेश वाघमारे , विठ्ठल काळे, बाळासाहेब गमे उपस्थित होते.कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा व नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संघाच्या वतीने करण्यात आला.रेणुका ताईंनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत उत्तम असून संजीवनी परिवार नेहमी शिक्षकांसोबतच राहील आणि संघाने केलेल्या या कार्यक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. राजेश आबा यांनी आपल्या मनोगतात कोपरगाव तालुका अहिल्यानगर जिल्ह्यात गुणवत्तेच्या बाबतीत नेहमी प्रथम असतो आणि यासाठी तालुक्यातील प्रशासन व शिक्षक यांचे मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन करत शिक्षक संघाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला त्याबद्दल संघाला विशेष धन्यवाद दिले.अध्यक्षीय भाषणात खासदार साहेबांनी मी देखील काही काळ शिक्षक होतो. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी राज्यस्तर तसेच केंद्रस्तरावर सर्वात अग्रेसर असेल असे आश्वासन दिले. शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करणे चुकीचे असून त्या विरोधात आवाज उठवला जाईल असे याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिक्षक, पालक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गव्हाणे सर व साबळे सर यांनी केले.कोपरगाव तालुक्याच्या ठिकाणी शिक्षकांसाठी हक्काचे शिक्षक भवन असावे अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली होती त्यास प्रतिसाद देत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी १५ लाख निधी दिला जाईल अशी घोषणा केली. तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिक्षकांना BLO कामातून वगळण्यासाठी प्रयत्न केले जातील.


