

जेऊर कुंभारी वार्ताहर
जि. प. शाळा गिरमेवस्ती येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापिका श्रीम.प्रियंका जोशी व शिक्षक सुदाम साळुंके यांची बदली झाल्याने शाळेत निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर भिमराज वक्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य दिपकराव गायकवाड, संजीवनी सहकारी साखर कारखान्याची माजी संचालक मधुकर पाटील वक्ते, उपसरपंच जालिंदर चव्हाण, शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष विशाल गुरसळ कोंडीराम वक्ते ,आशोक राऊत, किसन सोळके, राणा वक्ते,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश गुरसळ, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, नितीन इंगळे, नारायण गुरसळ, द्वारकानाथ देवकर,राहुल गुरसळ, सुनील गायकवाड, सुमित पगारे शिक्षक, विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका,शालेय पोषण आहार कर्मचारी व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर भिमराज वक्ते होते. शिक्षकांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले होते.
मान्यवर,शिक्षक व पालकांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. “विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमांची आवड निर्माण करण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे,” असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
निरोप प्रसंगी श्रीम. प्रियंका जोशी यांनी “गिरमेवस्ती शाळेत मला नेहमीच विद्यार्थ्यांचा, पालकांचा व सहकारी शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ही साथ कधीही विसरणार नाही,” असे मनोगत व्यक्त केले. तर श्री. सुदाम साळुंके यांनी “विद्यार्थ्यांच्या प्रगतीतूनच आम्हाला खरी ऊर्जा मिळते,” असे सांगून सर्वांचे आभार मानले.
शेवटी मान्यवरांनी,विद्यार्थ्यांनी फुलगुच्छ, शुभेच्छा पत्रे देऊन भावना व्यक्त केल्या. बदली झालेल्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या निरोप समारंभातून जोशी मॅडम व साळुंके सर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुज ढुमणे सर यांनी केले व आभार माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण यांनी मानले.


