
जेऊर कुंभारी वार्ताहर
राजकीय दृष्टया महत्वाच्या जेऊर कुंभारी गांव व परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी थेट खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे कार्यालय गाठत त्यांना रस्ते दुरुस्तीचे निवेदन दिले..
गांव विकासामध्ये रस्ते महत्वाची भूमिका बजावत असतात. दळणवळण व्यवस्थित चालले तरच गावाचा विकास होतो. मात्र कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाच्या जेऊर कुंभारी गावातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गांव विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे गांव व परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येऊन गांव विकासातील अडथळा दूर करण्यात यावा यासाठी मंगळवार दि.८ जानेवारी रोजी सरपंच सुवर्णा पवार ,माजी सभापती शिवाजीराव वक्ते ,संचालक बाळासाहेब वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, संजय वक्ते यांनी थेट खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचे शिर्डी येथील कार्यालय गाठत रस्ते दुरुस्ती संदर्भात निवेदन दिले. निवेदनात सावळीविहीर शिवरस्ता ते हरिसन ब्रँच शाळा, पांडुरंग वस्ती हे रस्ते दुरुस्त करण्यात यावेत. हे रस्ते शिर्डी व कोपरगाव यांना जोडलेले आहे तसेच दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या रस्त्याने शेतकरी वर्ग आपल्या शेतात जात असतात तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची स्कूल बस, जड वाहने या रस्त्याने जाण्यास अडथळे निर्माण होत आहे तेव्हा या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी सरपंच सुवर्णा पवार यांनी आली आहे


