
कोपरगाव प्रतिनिधी
१५ सप्टेंबर२०२४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे नेतृत्वात व सर्व संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित असणार आहेत. सरकारने लागू केलेले सुधारित पेन्शन योजना राज्यांमधील कर्मचाऱ्यांना मान्य नाही त्यामुळे विरोध करण्यासाठी आणि सरसकट जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जुनी पेन्शन संघटनेचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत वाडीले यांनी केले आहे.१९८२ व ८४ ची जुनी पेन्शन योजना जशास तशी लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आपले भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर पूर्वीप्रमाणे १९८२ आणि ८४ ची जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यात आली पाहिजे या मागणीसाठी राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन होणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष खांडेकर यांनी दिली आहे. सदर अधिवेशन राज्यसचिव गोविंद उगले राज्य कार्याध्यक्ष, आशुतोष चौधरी राज्य सहकार्याध्यक्ष, राजेंद्र ठोकळ, विनायक चोथे राज्य पदाधिकारी, रामदास वाघ, नाना गाढवे, शिवनाथ भुजबळ, प्रवीण झावरे, अरविंद थोरात आदी पदाधिकाऱ्यांच्या
मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातले लाखो कर्मचारी या पेन्शन महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची उपस्थिती राहणार असून ही आर या पार ची लढाई असून जास्तीत जास्त संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. साईबाबा आणि संत जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने आपला जुनी पेन्शनचा प्रश्न निश्चित सुटणार असून आपली एकजूट महत्वाची असल्याचे लक्ष्मीकांत वाडीले यांनी सांगितले. १५ सप्टेंबरला कोपरगाव येथे होणाऱ्या महाधिवेशनामध्ये राजकीय पक्षांनी उपस्थित राहून जुन्या पेन्शन बाबत आपली भूमिका जाहीर करावी. जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलेला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपलं मत जुन्या पेन्शन साठी तयार केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांनी दखल घेऊन सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी व महाराष्ट्रातल्या तमाम शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीपूर्वी आपली ताकद सरकारला दाखवून देणे गरजेचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने १५ सप्टेंबरच्या महाअधिवेशनामध्ये आपण लाखोच्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन चांगदेव ढेपले माजी चेअरमन,शशिकांत जेजुरकर संचालक शिक्षक बँक,अण्णासाहेब आभाळे-शिक्षक बँक संचालक, अशोक कानडे ,विद्युल्लता आढाव राष्ट्रीय नेत्या शिक्षक संघ ,सुभाष गरुड,अप्पासाहेब चौधरी,ज्ञानेश्वर सैंदाणे,बाळासाहेब मोरे,दत्तात्रय राऊत, वसंतराव भातकुडव,योगेश मोरे,लतिफखान पठाण,ज्ञानेश्वर माळवे,विनोदकुमार सोनवणे,रमेश निकम,महेंद्र गोसावी,नितीन लोहार,किरण निंबाळकर,संजय रोकडे,बंडू राठोड,शरद शिरसाठ,राहुल वायखिंडे,राहुल घोडे,वाल्मीक खंडीझोड,भरत गायकवाड,संजय खरात,,अविनाश पवार, रामदास कदम,सुनील सोनुने, यांच्यातर्फे करण्यात आले.


