
जेऊर कुंभारी वार्ताहर
गिरमे वस्ती शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत परिसर देशभक्तीमय केला.या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सरपंच राजेंद्र गिरमे,माजी उपसरपंच जालींदर चव्हाण,ग्रा.पं. सदस्य प्रदिप गायकवाड,रामभाऊ वक्ते
शा.व्य.समिती अध्यक्ष महेश गुरसळ,पाटिलबा वक्ते,डॉ सुजित गिरमे, मयूर गिरमे,नितीन इंगळे,किरण वक्ते,
रावसाहेब तात्या,शिवसुत्र प्रतिष्ठानचे संस्थापक सुधाकर वक्ते,नानाभाऊ मोहिते,कल्याण गुरसळ, द्वारकानाथ देवकर,राहुल गुरसळ,नवनाथ गुरसळ, सागर गुरसळ,संदीप माकोने,गणेश अंबीलवादे, अजहर शेख, प्रकाश वक्ते, सुनील गायकवाड़,किशोर गायकवाड,साईनाथ वायकर, सतीश वक्ते,किशोर काकडे,सोमनाथ पगारे,श्रीमाला गायकवाड,मुख्याध्यापिका प्रियंका जोशी, अंगणवाडी सेविका सिंधु वक्ते, आरोग्य सेवक, शा.पो.आहार कर्मचारी सुलोचना वक्ते, माता पालक गट सदस्य,आशा वर्कर
व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुंदरपणे देशभक्तीपर गीते सादर केली.गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ. सुजित गिरमे व मयूर गिरमे यांनी शाळेसाठी क्रीडा साहित्य भेट दिले.
स्वातंत्र्य दिनाचे फलकलेखन व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुज ढुमणे यांनी केले, प्रास्तविक सुदाम साळुंके यांनी केले . त्यानंतर मुलांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून स्वातंत्र्य दिनाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब वक्ते यांनी लहान मुलांनी केलेल्या मनोगताचे , शालेय परिसर सुशोभीकरणाबाबत मुलांचे व शिक्षकांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित माता पालक गटातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर श्रीमाला गायकवाड यांचा mpsc परीक्षेत प्राविन्य मिळवून अभियंता पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांसाठी पालकांनी व ग्रामस्थांनी आणलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका प्रियंका जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली.


