
जेऊर कुंभारी वार्ताहर
कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून
जेऊर कुंभारी ,चांदेकसारे, डाऊच खुर्द,घारी आदी करून गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दि १६ जून रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास जेऊर कुंभारी येथील गौतम बँकेचे संचालक बापूराव वक्ते यांच्या पाळीव शेळीवर बिबट्यानाने हल्ला करून जागिच ठार केला आहे अंदाजे सात ते आठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहेत
या घटनेने जेऊर कुंभारी परिसरातील भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाकडून या बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याने बापुराव वक्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाला वारंवार कळवून देखील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे. फक्त वेगवेगळी कारणे देऊन चालढकल करण्यात वनविभागाचे अधिकारी धन्यता मानत आहेत तर याचा काय उपयोग असा सवाल बापुराव
वक्ते यांनी उपस्थित केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकऱ्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तसेच मानवी जीवाला पण भिती निर्माण झाली आहे. शेळ्या बकऱ्या कुत्रे इत्यादी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून मारून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी वक्ते यांनी केली.


