
जेऊर कुंभारी वार्ताहर
नर्मदा परिक्रमेत प्रत्येक दिवशी वेगवेगळा अनुभव येतो. बिकट वाट, विस्तीर्ण जलाशय, अहंभाव टाळून श्रद्धायुक्त मनाने करावा लागणारा प्रवास त्यामुळे ही परिक्रमा तन, मन, धन अर्पूणच करावी लागते. नर्मदा परिक्रमा हा जीवन समृध्द करणारा अनुभव आहे. या परिक्रमेतील अनुभव हे थरारक असल्यामुळे अनुभव कथनापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेणे गरजेचे आहे. नर्मदा परिक्रमेचा प्रवास आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगण्याची कला शिकवतो असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे
यांनी केले.
जेऊरकुंभारी गावातील प्रगतशील शेतकरी संजय पांडूरंग चव्हाण यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल चव्हाण वस्ती या ठिकाणी जलपुजन व कन्यापुजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते. संजय पांडूरंग चव्हाण हे नर्मदा परिक्रमा करणारे जेऊर कुंभारी गावातील प्रथम मानकरी आहे. चव्हाण यांनी १०४ दिवसांत ३६०० किलोमीटरची परिक्रमा पायी पूर्ण केली. जेऊरकुंभारी येथील हनुमान मंदिर येथे बुधवार दि.२७ मार्च रोजी त्यांचे आगमन होताच, त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व मारूती मंदिर ते चव्हाण वस्ती या मार्गावर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सुवासिनींनी औक्षण केले तसेच नागरिकांनी पुष्पमाला अर्पण करून ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रम प्रसंगिक गौतम सहकारी बँकेचे संचालक बापूराव वक्ते, महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक सतिषराव आव्हाड, माजी संचालक मधुकर वक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेलचे तालुकाध्यक्ष महेंद्रजी वक्ते, गौतम सहकारी बँकेचे माजी व्हा. चेअरमन धोंडीरामजी वक्ते, माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, माजी सरपंच यशवंतराव आव्हाड,
कल्याणराव गुरसळ, दिलीपराव शिंदे, किरणजी वक्ते, पाटीलबाबा वक्ते, किशोर वक्ते, सुधाकर होन, अण्णासाहेब चव्हाण, राजेंद्र चव्हाण, सोपानराव वक्ते, रामभाऊ वक्ते,भास्कर चव्हाण, दादासाहेब चव्हाण, भिकाभाऊ चव्हाण अजिंक्य चव्हाण मिलनजी चव्हाण, बाळासाहेब वक्ते, कैलासजी वक्ते, अनिलजी चव्हाण, शांतीलाल होन, दौलत गुरसळ, नानासाहेब गुरसळ, रामनाथजी आव्हाड, केशवराव आबनावे, विरेंद्रजी शिंदे, शिवाजी वक्ते, राजेंद्र पुंगळ, राजेंद्र गिरमे, राजेंद्र पगारे, भानुदास वक्ते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


