

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव आगारातील चालक वाहकांच्या मनमानी कारभारा विरोधात जेऊर कुंभारी येथील महाराणा दक्षता समिती च्या वतीने दि.२ जून रोजी कोपरगाव आगरप्रमुख अभिजित चौधरी तसेच तहसीलदार विजय बोरुडे यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे
जेऊर कुंभारी डाऊच खुर्द चांदेकसारे या मार्गे कोपरगाव,संगमनेर ,नाशिकडे जात असतात या भागातुन एसटी ने
विद्यार्थी विद्यार्थिनी कोपरगाव येथील के जे सोमय्या व एस एस जी एम सह इतर शाळा व कॉलेज येत असतात परंतु बस या थांब्यावर थांबत नाही अशा तक्रारी विद्यार्थी व प्रवाशांनी केल्या आहेत.
थांब्यावर बस न थांबल्यामुळे हातातले काम सोडुन पालकांना आपल्या पाल्याला शाळेत सोडवयास जावे लागते त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो नुकताच डाऊच फाट्यावर झालेल्या अपघातामुळे पालक आपल्या पाल्यांना खासगी प्रवासी वहानांतुन पाठवण्यास घाबरत आहे आहेत
१५ जुन पासुन शाळा सुरू होत आहे विद्यार्थ्यांनी प्रवासी पास काढलेला असूनही बस चालक बस थांब्यावर थांबण्यास टाळाटाळ करतात अशा तक्रारी येत आहे त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना महाविद्यालयात व शाळेत वेळेवर पोचण्यासाठी उशीर होत आहे पर्यायी विद्यार्थांचे नुकसान होत आहे त्यास जबाबदार कोण आहे,तसेच
जेऊर कुंभारीची बस सुविधा पुर्ववत सुरू करण्यात यावी ही बस संजयनगर ते मारूती मंदिर पर्यंत सुरू करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे तरी
कोपरगाव आगारप्रमुखांनी या मागणीची तातडीने दखल घेवुन कारवाई करावी अन्यथा महाराणा प्रताप दक्षता समिती च्या वतीने
आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी उपसरपंच जालिंदर चव्हाण, शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विशाल गुरसळ राजेंद्र वक्ते, शशिकांत वक्ते, अजिंक्य चव्हाण, निलेश चव्हाण, योगेश चव्हाण,
संतोष वक्ते, अक्षय गुरसळ, विश्वजीत वक्ते, रोहीत जावळे,आदी सह जेऊर कुंभारी गावातील महाराणा दक्षता समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


