
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातीलजेऊर कुंभारी गावातील प्रगतशील शेतकरी शशिकांत वक्ते यांनी आपल्या लेखनातून आत्ताच्या वस्तुस्थितीचे दर्शन घडवले आहे शेतकऱ्यांचे वाद बांधावरून कसे होतात याचे उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या लेखन शैलीत मांडले आहे.
शेतकरी बांधवांचा सतत डोकेदुखीचा असलेला मुद्दा म्हणजे शेतीच्यां बांधावरील सतत होणारे वाद. मी ही गोष्ट फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी लिहितो आहे जे बांध न कोरणारे आहेत. आता तुम्ही म्हणाल की बांध न कोरनारे कोण व कोरनारे कोण ? ते पुढील लेखात स्पष्ट होईल. सर्व शेतकरी बांधवांना सांगु इच्छितो की, जर तुम्हाला वाटत असेल किंवा दिसत असेल की आपला बांध कोरला गेला आहे ( प्रथम सर्व शहनिशा करा की खरच समोरच्याने आपला बांध कोरला आहे )तर त्या कोरलेल्या बांधाची व्हिडिओ शूटिंग व फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून तुमच्या व्हॉट्स ॲपवर, फेसबुक वर, इंस्टाग्राम वर, न्युज पेपर अशा सर्व डिजिटल माध्यमांवर पोस्ट करा. पोस्ट करतांना दोन्ही शेतकऱ्यांचे जमिनीचे सर्वे नंबर व फोटो घेतलेली तारीख त्या पोस्ट सोबत टाकत चला. यातुन पोस्ट बघणाऱ्या जनतेला खरा बांध कोरणारा कोण? नक्की समजेल. कारण स्वतःची चूक या जगात कोणीच कबूल करत नाही तसे असते तर कायद्याची गरजच पडली नसती. ही तुमची मोहिम तोपर्यंत चालु ठेवा जोपर्यंत कोरणारा सुधारत नाही. कोरणारा श्रीमंत आहे का की राजकीय पुढारी याची चिंता करू नका. हि मोहिम सर्व शेतकऱ्यांनी चालवा कोरणा ऱ्याला नक्की फरक पडेल व तुमच्या कडे देखील पुरावा वर्षानुवर्ष जपुन राहील. कोर्ट कचेरी करत बसू नका पहिले पुरावे गोळा करा. कोरणाऱ्यची प्रत्येक चूक मोबाईल मध्ये कैद करा. जर बांधाच्या वादात कोणी मध्यस्थी करत असेल तर त्यावेळी सुद्धा व्हिडिओ व फोटो काढा म्हणजे मध्यस्थी करणारे सुद्धा सदोष मध्यस्थी करतील व तो देखील पुरावा तुमच्या कडे राहील. नालायक कृत्य करणाऱ्यांच्या चवा घाला ते नक्की सुधारतील आणि जोपर्यंत बांध कोरणारा सुधारत नाही तोपर्यंत आपली मोहिम अशीच चालू ठेवा.
यातुन फक्त शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्याचा एक प्रयत्न.


