
कोपरगाव प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे शक्य झाले आहे. कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी आणि शहराच्या विकासासाठी देखील १८ कोटी निधी दिला आहे. त्यामुळे विकासापासून दूर असलेलं कोपरगाव शहर विकासाच्या वाटेवर आले असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ५ च्या सर्वे क्र. ८८८ (८८९) मध्ये ९.९९ लक्ष रुपये निधीतून बांधण्यात येणारा सभामंडप, प्रभाग क्र. १३ च्या सर्वे क्र. १९२९ मध्ये १० लक्ष रुपये निधीतून नवीन छत बांधणे व सुशोभीकरण करणे, प्रभाग क्र. १२ सर्वे क्र. १०५ मध्ये हनुमाननगर भागात १२.४२ लक्ष रुपये निधीतून कब्रस्तान दुरुस्ती व सुशोभीकरण करणे तसेच मोहिनीराजनगर भागातील ५५.६० लक्ष रुपये निधीतून अमरधाम विकसित करणे आदी विकास कामांचे भूमिपूजन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की,अडीच वर्षापूर्वी कोपरगाव शहराची अवस्था काय होती. शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. खराब रस्त्यांचा परिणाम शहरातील छोट्या मोठ्या व्यवसायांवर झाल्यामुळे व्यवसायिकांच्या चिंता वाढल्या होत्या. परंतु महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यात मिळालेले यश आणि शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांसाठी निधी आणल्यामुळे आज शहराचा चेहरा नक्कीच बदलला आहे. शहरातील अमरधामची देखील मोठी दुरावस्था झाली होती. अमरधामच्या दुरुस्तीसाठी देखील निधी दिला आहे त्यामुळे त्याठिकाणी सोयी सुविधा निर्माण होणार आहेत. विविध समाजाच्या सभामंडपासाठी देखील निधी दिल्यामुळे प्रत्येक समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळणार असून या सभामंडपात विविध कार्यक्रम घेण्यास त्या त्या समाजाची सोय होणार आहे. मात्र एवढ्यावरच थांबून चालणार नाही शहर विकासाचे अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्याचा देखील निपटारा होणे गरजेचे असून त्यासाठी नगरपालिकेची सत्ता देखील तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विश्वास दाखवला त्याची परतफेड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावून व शहरातील रस्त्यांना व शहर विकासाला कोट्यावधी रुपयांचा निधी देवून केली आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणायचा हि जबाबदारी माझी असून नगरपालिकेत एकहाती सत्ता दयायची जबाबदारी तुमची आहे. अडीच वर्षात झालेला विकास पाहता ती जबाबदारी कोपरगाव शहरातील सुज्ञ नागरिक निश्चितपणे पार पाडतील असा विश्वास ना. आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे,हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, दिनार कुदळे, दिनकर खरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार,जावेद शेख, राहुल देवळालीकर,बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले,वाल्मिक लहिरे, इम्तियाज अत्तार, सुनील बोरा,संदीप देवळालीकर, शैलेश साबळे, योगेश वाणी, सागर लकारे, गणेश बोरुडे, राजेंद्र आभाळे, अॅड.मनोज कडू, मुकुंद इंगळे,प्रसाद उदावंत, प्रदिप कुऱ्हाडे, मनोज नरोडे,विकि जोशी, ऋषिकेश खैरनार, बाळासाहेब पवार, प्रसाद रुईकर, रितेश राऊत, प्रदीप मते,चंद्रकांत धोत्रे, शिवाजी कुऱ्हाडे, नगरपरिषद अभियंता सुनील ताजवे, हर्षवर्धन सुराळकर प्रभाग क्र. येथे कृष्णा उदावंत, डॉ. किशोर नागरे, उल्हास नागरे, ज्ञानेश कपिले, संजय मंडलिक, ज्ञानेश विसपुते, योगेश निकम,अंबादास गीते, नागरे गुरुजी, सुनील मंडलिक,संजय उदावंत, सचिन भडकवाडे,डहाळेकाका, अमोल चिंतामणी, अजित पोरवाल, लवेश बागुल, गणेश उदावंत, किशोर उदावंत, दत्तात्रय उदावंत, कैलास माहूरकर,अभिजित मंडलिक, सुनील माळवे, दत्तात्रय दहिवाल, विश्वनाथ उदावंत, बंटी पांडे,भानुदास लोणारी, प्रकाश भडकवाडे, अनिकेत भडकवाडे, राजु भडकवाडे, संजय जळगावकर, सचिन उदावंत, बाळासाहेब नागरे, राजेंद्र कपोते, अरविंद मंडलिक, प्रभाग क्र. १३ येथे माळी बोर्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, विश्वस्त रामभाऊ बनकर,हनुमंत भोंगळे, शेखर भोंगळे, मच्छिन्द्र पठाडे,गोरे सर, प्रभाकर पाटील, साईनाथ बोरावके,अनिल शेवते, सदाशिव रासकर, रविंद्र चौधरी,गौतम टिळेकर, पुंडलिक माळी, कैलास माळी,अनिल बनकर, राजेंद्र गिरमे, हेमंत बोरावके,चंद्रशेखर भोंगळे, गिरीश हिवाळे, रविंद्र काळणे, रविंद्र चौधरी, केशव पांढरे, विलास सपकाळ, रमेश टिळेकर, नंदकुमार बोरावके,किशोर टिळेकर, गौतम टिळेकर, कालिदास घारमाळकर, अनिल गिरमे, विलास पांढरे,विजय मालकर, रंजन जगझाप, सुरेश मालकर,मनोज जगझाप, सागर भोंगळे, ओंकार वढणे,ओम वढणे, अनिल पांढरे, सुभाष पांढरे,वाल्मिक भास्कर, प्रभाकर ससाणे, निवृत्ती बनकर, रत्नाकर काळे, विठ्ठल टिळेकर, अनिल बनकर, नंदकुमार शिवरकर, बबनराव बनकर,गणपत विधाते, प्रभाकर बोरावके, चंद्रभान कोद्रे, सुभाष भास्कर, रमेश भास्कर, अन्सार भास्कर, ऋषिकेश वाघ, नरेंद्र गिरमे, सूर्यकांत बोरावके, प्रभाग क्र. १२ येथे मौलाना हमीद,मौलाना निसार, शफीक शेख, रशीद शेख,आरिफ शेख, सत्तार शेख, युसूफ शेख,अल्ताफ पठाण, शाहरुख शेख, सलिम मन्सूरी,फकीर शेख, नवाज शेख, शकील खाटीक,पप्पु सय्यद, समीर खाटीक, काळू कच्छी,खलील शेख, आयुब शेख, आमीन पठाण,आसिफ शेख, हाजी शमोशुद्दीन सय्यद, इमरान पठाण, साजिद शेख, शकुर शेख, लियाकत सय्यद, राजु खाटीक, ठेकेदार राजेंद्र डागा,मोहिनीराजनगर येथे विलास आव्हाड, निलेश पाखरे, राजेंद्र जोशी, नानासाहेब गोर्डे,काकासाहेबजी गोर्डे, भाऊसाहेब लोहकरे,पुंडलिक वायखिंडे, आप्पासाहेब क्षीरसागर,भाऊसाहेब शिंदे, राज परदेशी, अक्षय पंडोरे,ऋषिकेश आव्हाड, विकास शर्मा, भावेश सोनवणे, दत्तू लोहकरे, ताहीर पठाण, मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, लहानू सुपेकर,वैजनाथ गोर्डे, बापू काकडे, अनिल परदेशी,सुरेश सुपेकर, निवृत्ती आहेर, सुमित कोळी,गणेश आव्हाड, मनोहर म्हैसमाळे, वैभव गीते,आनंद आव्हाड, मिलिंद सोनवणे, विजय वायकर, शैलेश वाघ, निखील परदेशी, वाल्मिक परदेशी, चंद्रभान सुपेकर, कृष्णा सुपेकर,स्मिता वायखिंडे, कांचन मेढे, अनिता गवळी,मालती गवळी, शितल वायखिंडे, शोभा आहेर आदी उपस्थित होते.


