
कोपरगाव प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या बंधाऱ्यातील पाणी आटले असून नुकताच महसूल विभागाने वाळू ठेक्याचा लिलाव केला मात्र लिलावाच्या नावाखाली पोलीस व महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने राजरोस व उजळ माथ्याने धारणगाव रोडने वाहतूक सुसाट वेगाने सुरू असून अनर्थ घडण्यापूर्वी शहराच्या मुख्य रस्त्यावरून सुरू असलेली वाळू वाहतूक थांबवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की
गोदावरी नदीवरील बंधाऱ्यातील पाणी आटले असून महसूल विभागाने नदीतील वाळूचे लिलाव केले आहे
वाळूच्या लिलावाच्या नावाखाली राजरोसपणे चोरटी वाळू वाहतूक सुरू असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने ही वाळू वाहतूक राजरोज पणे सुरू आहे
कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक हा रस्ता गेल्या अनेक वर्षांच्या मागणी वरून पूर्णत्वास येत आहे त्यामुळे हे वाळूचे मोठं मोठे हायवा डंपर भरधाव वेगाने कोणाला न जुमानता या रस्त्याने जात असतात मात्र नुकतीच कोपरगाव तालुक्यात मोठ्या कंटेनर ने भरधाव वेगात चालवून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली
कोपरगाव शहरातून भरधाव चोरटी वाळू वाहतूक सुरू असून शहरातील मुख्य रस्त्यावरून ही वाहतूक सुरू असून पोलीस व महसूल अधिकारी यांच्या कृपाशीर्वादा शिवाय शहरातून वाळू वाहतूक होऊ शकत नाही मागील काही वर्षांपूर्वी शहरातून वाळू वाहतूक होऊ नये म्हणून काही राजकीय नेते रस्त्यावर उतरले होते मात्र नंतर अर्थपूर्ण चर्चे नंतर शहरातून वाळू वाहतूक सुरळीत सुरू झाली होती त्याच प्रमाणे मागील काही महिन्यांपूर्वी चोरटी वाळू वाहतूक थांबवण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र ते देखील आजून तरी सायलेंट मोडवर आहे विशेष म्हणजे कोपरगाव शहरात रस्त्यावर दुचाकी उभी असल्यास पोलीस लगेच गाडीचा फोटो काढून पावती पाठवून देत वसुली करत आहेत मात्र या हायवा डंपरच्या वाहतुकी कडे मोठ्या वसुली मुळे कोणीच लक्ष देत नाही हे विशेष म्हणावे लागेल
मागील एक दिड वर्षात महसूल विभागातील सर्कल,तलाठी वाळू तस्करांसोबत आर्थिक वाटाघाटी न जमल्याने अँटी करप्शन च्या जाळ्यात सापडले होते तसेच आजही तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला व पोलीस स्टेशनला अनेक वाळू पंटरांचा राबता असतो व हे पंटर काही अधिकाऱ्यांसोबत चांगला आर्थिक पाहुणचार करताना दिसतात
सद्या देखील ही वाहतूक राजरोसपणे सुरू असून भर वस्तीतून भरधाव वेगाने सुरू आहे मात्र एखादी दुर्दैवी घटना घडून गेल्यावर जाग येण्यापेक्षा शहराच्या मुख्य रस्त्यावरून सुरू असलेली वाळू वाहतूक त्वरित थांबवावी असे या पत्रकात म्हटले आहे.


