
लेख
कोपरगाव तालुक्याचा ‘परिसर, रामायणात दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वे कडे वाहते.
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावण झालेला. हा परीसर व गोदावरी नदीच्या उजव्या तसेच डाव्या तीरावरून प्रभू रामचंद्र व सीतामाई यांचे वनवासकाळात भ्रमण झालेले आहे. त्या संदर्भात स्थळ, काळ, घटना व प्रसंगानुरूप अनेक दंतकथा ऐकिवात असून त्यांचा वर्तमान परिस्थितीशी संदर्भ लागू शकतो… जेऊर कुंभारी या गावाला ४०० वर्षापुर्वीचा पौराणीक मंदीरांचा तसेच ऐतिहासीक स्थळाचा वारसा लाभला असून येथील मंदीरे व वास्तु १७ व्या शतकातील पेशवेकालीन स्थापत्य शास्त्राचा ऊत्कृष्ट नमुना असल्याचा उल्लेख येथील मंदीरावरील शिलालेखात आढळतो. इतिहास हा फक्त वाचावा लागत नाही. तर तो बघावा लागतो, अनुभवा लागतो, आणि जगावा लागतो. आजही या इतिहासकालीन पाऊलखुणा या गावात नक्कीच बघायला मिळतात. १७ व्या शेतकातीलपवार राजांच्या
शतकातील अंमलाखाली येथील राज्यकारभार चालत असल्याचे जाणकारांचे मत आहे कारण राजांच्या भव्य वाड्याचे अवषेश आजही तेथे पहावयास मिळतात. त्या वेळच्या समृद्धतेची कल्पना या वास्तू पाहिल्यावर नक्कीच येते. वाड्यासमोर भगवान शिवशंकर, खंडेराव, मारुती नक्टी देवीचे दगडीशिळा व चुन्या मातीत बांधलेली मंदीरे आजही इतिहासाची साक्ष देतात. तसेच येथील राज्याची छत्रीत आपल्याला तत्कालीन श्रीमंतीची चुणुक पहावयास मिळते या छत्री खाली बसुन राजा गावाचा कारभार पाहत असल्याची अख्यायिका आहे.


संपुर्ण गावाला तटबंदी असल्याने गावच्या वेसीतुनच गावात प्रवेश दिला जात त्यासाठी भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आली होती. म्हणजेच त्या काळी सुरक्षेचा विचार जाणीवपूर्वक केला जात असे हे प्रामुख्याने लक्षात येते. येथील मंदीरा समोरील दिपमाळा ४०० वर्षानंतरही आजही दिमाखात उभी असुन इतिहासाची साक्ष देत आहेत. या इतिहासाच्या पाऊलखुणा काळाच्या ओघात मिटल्या जावू नयेत, आपला गौरवशाली इतिहास आपल्या संपन्नतेची, समृद्धीची, अभिमानाची साक्ष असतो. आणि हाच इतिहास आपण नवीन पिढीला प्रदान करत असतो. म्हणूनच त्याचे जाणीवपूर्वक संवर्धन करणे हि आपली जबाबदारी आहे.या इतिहासाच्या पाऊलखुणा पुन्हा अनुभभवयाच्या असतील तर नक्कीच जेऊर कुंभारी गावास नक्कीच भेट द्यायला हवी.

प्रा.मधुकर सोपान वक्ते, जेऊर कुंभारी ता. कोपरगाव
–


